Medicinal Plants Farming : पारंपरिक शेतीतून औषधी शेतीकडे वळणारा नवा प्रवास सुरू झाला आहे. बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता औषधी वनस्पतींची लागवड हा एक शाश्वत आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. (Medicinal Plants Farming)
कृषी विभागाच्या 'आत्मा' (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन) यंत्रणेद्वारे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना औषधी पिकांची माहिती, लागवड तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जोडणी याबाबत प्रभावी व योजनाबद्ध मार्गदर्शन सुरू झाले आहे. (Medicinal Plants Farming)
'तुळस'पासून ते 'अश्वगंधा' पर्यंत विविध औषधी पिके आता शेतकऱ्यांच्या नव्या आशेचा किरण ठरत असून, कमी पाण्यात, कमी जोखमीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी यात आहे.(Medicinal Plants Farming)
बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेती संकटात आली असताना, आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशेचा किरण ठरत आहे. (Medicinal Plants Farming)
औषधी पिकांची लागवड
कृषी विभागाच्या 'आत्मा' (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) यांच्यावतीने शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळवण्यासाठी प्रभावी व योजनाबद्ध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींची सखोल माहिती, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगातील संधी आणि बाजारपेठेचे मार्गदर्शन दिले जात आहे. यामुळे शेतीला एक नवा शाश्वत पर्याय मिळतो आहे.
काळाची गरज
गेल्या काही वर्षांतील हवामान बदल, सततचे रोगराई आणि पारंपरिक पिकांचे घटते उत्पादन यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अशा पार्श्वभूमीवर कमी पाण्यात तग धरून राहणारी, रोगप्रतिरोधक क्षमता असलेली आणि बाजारात चांगला भाव मिळवणारी औषधी पिके ही शाश्वत शेतीची चांगली दिशा ठरत आहे.
शासनाचा सक्रिय सहभाग
औषधी पिकांची मागणी आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी आणि फार्मास्युटिकल उद्योगात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही वनस्पतींची लागवड वाढवण्यासाठी शासनाकडून अनुदान योजना, प्रशिक्षण शिबिरे आणि बाजारपेठ जोडणीचे प्रयत्न सुरू आहेत.
पाणलोट क्षेत्रातही या उच्च मूल्य असलेल्या वनस्पतींच्या लागवडीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांनी अश्वगंधा, अक्कलकड्डा, सफेद मुसळी, तुळस, काळमेघ यासारख्या औषधी पिकांची लागवड केल्यास त्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.- अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक