Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Season : खरीपाआधीच टंचाईचे संकट; वेळेवर पेरणी होणार का? वाचा सविस्तर

Kharif Season : खरीपाआधीच टंचाईचे संकट; वेळेवर पेरणी होणार का? वाचा सविस्तर

latest news Kharif Season: Shortage crisis before Kharif; Will sowing be done on time? Read in detail | Kharif Season : खरीपाआधीच टंचाईचे संकट; वेळेवर पेरणी होणार का? वाचा सविस्तर

Kharif Season : खरीपाआधीच टंचाईचे संकट; वेळेवर पेरणी होणार का? वाचा सविस्तर

Kharif Season : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं आणि DAP खताच्या साठ्यातील तुटवड्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागणी लाखोंच्या घरात असतानाही उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Kharif Season)

Kharif Season : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं आणि DAP खताच्या साठ्यातील तुटवड्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागणी लाखोंच्या घरात असतानाही उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Kharif Season)

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Season : खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाच अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं आणि DAP खताच्या साठ्यातील तुटवड्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागणी लाखोंच्या घरात असतानाही उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Kharif Season)

अकोला जिल्ह्यात सद्यःस्थितीत एका विशिष्ट वाणाच्या कपाशी बियाणाची केवळ एक हजार पाकिटे आणि 'डीएपी' खताचा १ हजार १०० मेट्रिक टन साठा उपलब्ध असून, मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने, जिल्ह्यात यंदा संबंधित बियाणे व खताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसा पुरवठा होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Kharif Season)

पेरणीलायक पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात लवकरच यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होणार आहेत. त्यानुषंगाने पेरणीसाठी लागणारे बियाणे आणि खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामध्ये जिल्ह्यात कपाशीच्या एका विशिष्ट वाणाच्या बियाणाला आणि 'डीएपी' खताला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे. (Kharif Season)

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात या कपाशी वाणाच्या बियाणाची तीन लाख पाकिटांची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली असून, त्या तुलनेत ५ जूनपर्यंत जिल्ह्यात या बियाणाची केवळ १ लाख १२ हजार पाकिटे उपलब्ध झाली. (Kharif Season)

तसेच २५ हजार मेट्रिक टन 'डीएपी 'खताची मागणी असताना, त्यापैकी ५ हजार मेट्रिक टन या खताचा पुरवठा करण्यात आला आहे. (Kharif Season)

सद्यः स्थितीत जिल्ह्यात संबंधित कपाशी बियाणाची केवळ एक हजार पाकिटे आणि १ हजार १०० मेट्रिक टन 'डीएपी' खतसाठा उपलब्ध आहे. 

मागणीच्या तुलनेत कपाशी बियाणे आणि डीएपी खताचा पुरवठा होत नसल्याने, पेरण्या सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात या बियाणासह डीएपी खताचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
डीएपी ४४२, युरियाचा ४२२ मेट्रिक टन खतसाठा संरक्षित

जिल्ह्यात ४४२ मेट्रिक टन डीएपी खतसाठा आणि ४२२ मेट्रिक टन युरिया खताचा साठा संरक्षित असून, तुटवडा निर्माण झाल्यास संरक्षित खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली. 

जिल्ह्यात सद्य:स्थितीत सर्वाधिक मागणीच्या कपाशी बियाणाची एक हजार पाकिटे आणि १ हजार १०० मेट्रिक टन डीएपी खताचा साठा उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने, शेतकऱ्यांनी उपलब्ध पर्यायी वाणाचे बियाणे व खतांचा वापर करण्याची गरज आहे. - डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जि.प.

हे ही वाचा सविस्तर : Kharif Season : अकोल्यात कपाशी बियाणे आणि डीएपी खताचा तुटवडा; शेतकऱ्यांच्या तयारीला 'ब्रेक'? वाचा सविस्तर

Web Title: latest news Kharif Season: Shortage crisis before Kharif; Will sowing be done on time? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.