Join us

Kanda Crop Damage : एकही कांदा बाजार नेण्याजोगे राहिला नाही, पावसानं होत्याचं नव्हतं केलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 19:53 IST

Kanda Crop Damage : 'हा कांदा मार्केटमधी (Kanda Market) घ्यायला कुणी तयार नाही, आता घेतलेले कर्ज कस फेडायच.

Kanda Crop Damage : 'हा कांदा मार्केटमधी (Kanda Market) घ्यायला कुणी तयार नाही, आता घेतलेले कर्ज कस फेडायच, असा प्रश्न आहे. पण सरकार शेतकऱ्यांच्या उदासीन आहे. शेतकऱ्यांपर्यंत कुठलीच मदत मिळत नाही. गेली अनेक वर्षे शेती करतोय, पण शेतकऱ्यांना आधार म्हणून कुणी उभं राहतंच नाही' अशी बोलकी प्रतिक्रिया गिरणारे येथील कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ थेटे यांनी दिली. 

एकीकडे पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान (Crop Damage) केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यात गिरणारे जवळील थेटे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जवळपास पावणे तीन एकरावरील एकही कांदा शिल्लक राहिला नाही नाही. पावसाने पूर्णतः कांदा खराब झाला असून अजून एक रुपयासुद्धा या कांदा पिकातून मिळाला नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. 

Video : ना तलाठी आला, ना मंडळ अधिकारी, पावणे तीन एकरावरील एकही कांदा बाजारात नेण्याजोगे राहिला नाही!

नाशिक तालुक्यातील (Nashik District) गिरणारे-दुगाव रस्त्यावर सोमनाथ थेटे यांची शेती आहे. थेटे यांनी संक्रातीच्या वेळी कांद्याची जवळपास तीन एकरवर कांदा लागवड केली. जवळपास काढणीला येईपर्यंत दीड दोन लाख रुपयांचा खर्च केला. मात्र ऐन काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल. संपूर्ण कांदा या पावसात सापडल्याने अद्यापही हे शेतकरी जमेल तो कांदा गोळा करून सुकवायचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. 

थेटे यांचे वडील म्हणाले, 'यापूर्वी असा पाऊस पाहिला नाही. आम्ही दहा वर्षांपासून कांद्याची शेती करतॊ आहोत. वेळच्या वेळी लागवड, वेळच्या वेळी काढणी केली जाते. पण यंदा पावसाने काहीच हाती लागू दिल नाही. संपूर्ण कांदा पावसात सापडला. आता यातला एकही कांदा बाजारात नेण्याजोगे राहिला नाही.' त्यामुळे एक रुपयाचा सुद्धा फायदा होणार नसल्याचे ते म्हणाले. 

'आमच्या कुटुंबाने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र पावसामुळे एकही कांदा शिल्लक राहिला नाही. हे नुकसान झालं, मात्र ना तलाठी आला, ना मंडळ अधिकारी. दोन दिवस फोन करूनही कोणी यायला तयार नव्हते. जेव्हा आले, तेव्हा म्हणाले की, जर कांदा पिकांची नोंद उताऱ्याला नसेल, तर नुकसान भरपाई मिळणार नाही, आता नोंद करा, म्हणजे पुढच्या कांद्याला भरपाई मिळेल, मग शेतकऱ्यानं करायचं काय?

आज दीड-दोन लाख रुपयांचा खर्च केला, त्यात पावसानं नुकसान केलं. आता पाच वर्षे या नुकसानीची फेड करणे आहे. आज अनेक गोष्टीचं कर्ज घेतलं आहे. आता ते कसं भरायचं? सरकार नुकसान भरपाईचे आदेश काढते, पण शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नाही.'-सोमनाथ थेटे, कांदा उत्पादक शेतकरी, गिरणारे 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रपाऊसपीक विमानाशिक