Agriculture News : विकसित कृषी संकल्प अभियानातुन (Viksit Krushi Sankalp Abhiyan) आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वातावरणातील बदलानुरूप पिकांचे नवनवीन वाण, रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीपध्दती, पिकांच्या उत्पादनवाढीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान,पशुपालन, मत्स्यपालन, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांची माहिती पोहोचविणे हा आहे.
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान - २०२५ हे राष्ट्रीय स्तरावरील अभियान २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत दि. ५ जून २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील बागलाण आणि देवळा तालुक्यांतील एकूण ६ गावांमध्ये विविध विषयांवर कृषी विज्ञान केंद्र (KVK) मालेगाव राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी (पुणे), कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) आणि आत्मा नाशिक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
बागलाण तालुक्यातील कार्यक्रम :
नामपूर, श्रीपुरवडे आणि ब्राम्हणपाडे या गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय यांनी "जमीन आरोग्य व्यवस्थापण तसेच जमीन आरोग्यपत्रिकेच्या आधारे संतुलित खत वापरातून लागवड खर्च कसा कमीकरता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. एस. डी. रामटेके प्रधान शास्त्रज्ञ यांनी भाजीपाला आणि फळपिकात पिकात वाढ नियंत्रकचा वापर (PGR) याबाबत मार्गदर्शन केले.
तर कृषी विज्ञान केंद्राचे अमित पाटील प्रमुख कृषि विज्ञान केंद्र मालेगाव यांनी विकसित कृषि संकल्प अभियान बाबत प्रास्तविक करून अभियानच्या नियोजानाबत माहिती दिली. कृषि पर्यवेक्षक गोसावी यांनी कृषि विभागाच्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी महाले, मंडळ कृषि अधिकारी चव्हाण, कृषि पर्यवेक्षक सोनवणे, कृषि सहाय्यक तुषार देसले तसेच कृषि विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केव्हीकेचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी केले..
देवळा तालुक्यातील कार्यक्रम :
५ जून २०२५ रोजी भऊर, सावकी आणि विठेवाडी या गावांमध्ये विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर यांनी खरीप पिकातील खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. अहमद शब्बीर यांनी भात आणि सोयाबीन एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत सखोल माहिती दिली.केव्हीकेचे पवन चौधरी यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले, तर विशाल चौधरी यांनी नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक शेती निविष्ठा वापर आणि नैसर्गिक शेती निविष्ठानिर्मिती पध्दती याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या सर्व कार्यक्रमांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन:
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमित पाटील यांनी सांगितले की, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शास्त्रज्ञांच्या दोन टीम्स तयार करण्यात आल्या आहेत, ज्या दररोज प्रत्येकी तीन गावांमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
KVK कार्यक्षेत्रातील एकूण ९० गावांमध्ये हा अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या शेतीला अधिक सक्षम व फायदेशीर बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.