Lokmat Agro >शेतशिवार > Farmer Unique ID Cards : 'आयडी' नाही, तर मदत नाही; शासनाच्या नव्या नियमाचा काय होईल परिणाम वाचा सविस्तर

Farmer Unique ID Cards : 'आयडी' नाही, तर मदत नाही; शासनाच्या नव्या नियमाचा काय होईल परिणाम वाचा सविस्तर

latest news Farmer Unique ID Cards: No 'ID', no help; Read in detail what will be the impact of the government's new rule | Farmer Unique ID Cards : 'आयडी' नाही, तर मदत नाही; शासनाच्या नव्या नियमाचा काय होईल परिणाम वाचा सविस्तर

Farmer Unique ID Cards : 'आयडी' नाही, तर मदत नाही; शासनाच्या नव्या नियमाचा काय होईल परिणाम वाचा सविस्तर

Farmer Unique ID Cards : शासनाच्या एका निर्णयाने तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या हातून विम्याचे कवच निसटणार आहे. फळपिकांना हवामान बदलाचा धोका असताना संरक्षण न मिळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. फार्मर आयडीविना तीन लाख शेतकरी विम्याच्या कवचाबाहेर जातील. १५ जूनची अंतिम मुदत, पण प्रक्रिया ठप्प झाली आहे. (Farmer Unique ID Cards)

Farmer Unique ID Cards : शासनाच्या एका निर्णयाने तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या हातून विम्याचे कवच निसटणार आहे. फळपिकांना हवामान बदलाचा धोका असताना संरक्षण न मिळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. फार्मर आयडीविना तीन लाख शेतकरी विम्याच्या कवचाबाहेर जातील. १५ जूनची अंतिम मुदत, पण प्रक्रिया ठप्प झाली आहे. (Farmer Unique ID Cards)

शेअर :

Join us
Join usNext

रूपेश उत्तरवार 

राज्य सरकारने कृषी योजनांतील लाभासाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य केल्यानंतर खरीप हंगामातील फळपिक विमा योजनेत मोठा पेच उभा राहिला आहे. (Farmer Unique ID Cards)

यवतमाळसह सात जिल्ह्यांतील तब्बल ३ लाख २० हजार शेतकरी अजूनही फार्मर आयडीच्या प्रक्रियेबाहेर आहेत. यामुळे हे शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असून, १५ जूनपर्यंत आयडी तयार करणे आता जवळपास अशक्यच मानले जात आहे. (Farmer Unique ID Cards)

विम्याशिवाय शेतकऱ्यांचे फळपिक धोक्यात

हवामान आधारित फळपिक विमा योजना 'पुनर्रचित' स्वरूपात लागू करण्यात आली आहे. यामध्ये आंबिया आणि मृग बहार यांसारख्या फळपिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. मात्र, फार्मर आयडीशिवाय कोणताही विमा मंजूर केला जाणार नाही, असे आदेश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी काढले आहेत.

जिल्हानिहाय शेतकऱ्यांची स्थिती

यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, पालघर

एकूण शेतकरी : १७.८७ लाख

आयडी काढले : १४.६७ लाख

आयडीविना शेतकरी : ३.२० लाख

नुकसान भरपाईही शक्य नाही

हवामान बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास विमा नसलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही. कोट्यवधींच्या नुकसानीपुढे शेतकऱ्यांची हतबलता वाढण्याची शक्यता आहे.
 
तांत्रिक आणि व्यवहार्य अडचणी

* अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल लिंक नसल्याने OTP मिळत नाही.

* स्थलांतरित व परराज्यातील शेतकरी अद्याप नोंदणी करू शकलेले नाहीत.

* काही शेतकरी मयत असून जमिनीचे फेरफार न झाल्याने, वारसदार आयडी तयार करू शकले नाहीत.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Variety : खारपाण पट्ट्यात 'त्या' कपाशी वाणाचा तुटवडा; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: latest news Farmer Unique ID Cards: No 'ID', no help; Read in detail what will be the impact of the government's new rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.