Lokmat Agro >शेतशिवार > Ai In Farming : शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी एआय फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर 

Ai In Farming : शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी एआय फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर 

Latest News Ai For Agriculture Can AI be beneficial for agriculture and farmers Read in detail | Ai In Farming : शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी एआय फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर 

Ai In Farming : शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी एआय फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर 

Ai In Farming : शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोके वर काढतोय. अशा परिस्थितीत..

Ai In Farming : शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोके वर काढतोय. अशा परिस्थितीत..

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे
नागपूर :
हवामानाचे चक्र बिघडले आहे, जमिनीचा पोत बदलतोय, किडींची वाढलेली प्रतिकारशक्ती व नव्या प्रजाती आणि या सर्वांचा थेट परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या संघर्षावर. शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोके वर काढतोय. अशा वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा किरण म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) शेतकऱ्यांसाठी (Ai In Farming) आशेचा नवा उजेड ठरू शकतो का? 

जगभर शेतीत ‘एआय’चा (Ai In Agriculture) उपयोग करून अचूक हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन, रोबोटिक तंत्र, आणि ‘स्मार्ट फार्मिंग’ सुरू आहे. मात्र, भारतात याची शक्यता, अडथळे व भविष्यातील दिशा यावर व्यापक चर्चा गरजेची आहे. कारण, जर शेती वाचवायची असेल तर तिला शहाणपणाचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार लागणारच आहे.

राज्य सरकारने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्रातील एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी पुढील दाेन वर्षांकरिता ५०० काेटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याअनुषंगाने राज्यात कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. काही कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, त्यांनी केलेल्या अभ्यास व प्रयाेगांचे प्रात्यक्षिके दाखविली जात आहे.

फूड टेक्नाॅलाॅजीसह शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक उद्याेगांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करता येताे. एआयचा वापर कोरडवाहू शेतकऱ्यांनी कसा करावा, यावर विचार करणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा भांडवली खर्च, हाताळणी व देखभाल खर्च, गुंतवणूक याच्या ताळेबंदाचा विचार व्हावा. अन्यथा सेन्सर, ड्रोन, सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्या व स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्रांना या तंत्रज्ञानातून नफा मिळेल आणि शेतकरी लुटला जाईल.

‘ॲप’द्वारे लगेच सूचना
यासाठी विशिष्ट ॲप विकसित केले जात आहे. त्या ॲपद्वारे सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतातील मातीत असलेली अन्नद्रव्ये, ओलावा, वाफसा, तापमान, पिकांना पाण्याची गरज, पाण्याचे बाष्पीभवन याची अचूक माहिती व आकडेवारी मिळते. पिकांवर राेग व किडींचा प्रादुर्भावाची सुरुवात हाेताच त्याचीही सूचना दिली जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा किमान ४० टक्के व खतांचा ३० टक्के वापर कमी हाेत असून, पीक उत्पादनात ४० टक्के वाढ हाेऊ शकते.

मूलभूत सुधारणा आवश्यक
भारत उष्णकटिबंधीय प्रदेश असल्याने परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची तंत्रज्ञान व काैशल्य निपुणता विचारात घेणे, वैज्ञानिक क्लिष्टता टाळणे, कृषी निविष्ठा वाजवी दरात तसेच सरकारी अनुदानावर सहज उपलब्ध करून देणे, जमिनीतील सेन्सर इनपुटसाठी २४ तास वीजपुरवठा, सॅटेलाईट मॅपिंग सपोर्ट, जीपीएस, इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी नेटवर्क उपलब्धता, ओव्हरहेड लाईट वायर, ट्रान्सफार्मर, पक्षी यामुळे ड्रोनचे तसेच वन्यप्राण्यांमुळे या संयंत्रांचे हाेणारे नुकसान यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचार करणे व त्यात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Latest News Ai For Agriculture Can AI be beneficial for agriculture and farmers Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.