Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : जमिनीची सुपीकता वाढवायचीय, 'या' गोष्टींकडे द्या लक्ष..!

Agriculture News : जमिनीची सुपीकता वाढवायचीय, 'या' गोष्टींकडे द्या लक्ष..!

Latest News Agriculture News To increase soil fertility, pay attention to 'these' things | Agriculture News : जमिनीची सुपीकता वाढवायचीय, 'या' गोष्टींकडे द्या लक्ष..!

Agriculture News : जमिनीची सुपीकता वाढवायचीय, 'या' गोष्टींकडे द्या लक्ष..!

Agriculture News : जमिनीची सुपीकता कमी होणे म्हणजेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब (organic carbon) कमी होणे आहे.

Agriculture News : जमिनीची सुपीकता कमी होणे म्हणजेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब (organic carbon) कमी होणे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

धुळे : जमिनीतून मिळणाऱ्या पिकांचे उत्पादन (Crop Production) हे दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजेच जमिनीची सुपीकता कमी होणे, जमिनीची सुपीकता कमी होणे म्हणजेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब (organic carbon) कमी होणे आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक झाले आहे. 

सध्या खरिपाची तयारी (Kharif Season) शेतकऱ्यांकडून सुरू असताना अमिनीची सुपीकता वाळवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सेंद्रिय खतांच्या वापराच्या वाढीसाठी अनेक माध्यमातून प्रोत्साहन मिळत असताना याचादेखील उपयोग शेतकऱ्यांनी करून घेत जमिनीची सुपिकता वाढीसाठी मदत करून घ्यावी, यातून उत्पन्नदेखील वाढीस मदत होणार आहे. 

काय उपाययोजना कराव्यात?
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हिरवळीच्या खतांची पेरणी करणे, हिरवळीची खते जसे बोरू, ताग, डेंबा, गिरीपुष्प, मूग पांची पेरणी करून घ्यावी.

पीक फुलोरा येण्याच्या आधी अर्थातच ३० ते ४५ दिवसांच्या दरम्यान जमिनीत ट्रॅक्टरने नांगरणी करून जमिनीत गाडून द्यावे, त्यामुळे जमिनीत पुढील पिकांसाठी नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्य उपलब्ध होतील. याशिवाय हिरवळीच्या पिकांचे अवशेष जमिनीत कुजत असताना सूक्ष्मजीवांच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषण सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते. यातून शेतकन्यांना फायदा होण्यास मदत होत असल्याचे दिसून येते. 

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण
वाढवण्यासाठी गांडूळ खताचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांकडे शेड उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी गांडूळ खत तयार करून साठवणूक करावी व पेरणीवेळी त्याचा वापर करावा.
- अविनाश कुवर, कृषी सहायक

सेंद्रिय कर्बाचे महत्त्व काय?
सहःपरिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत हे शेतात टाकण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे तसेच त्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे, शिवाय ते महाग असल्यामुळे शेतकन्यांचे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत हे शेतात राकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाले आहे. त्यामुळे अमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन सुपीकता कमी होत आहे.

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे
सेंद्रिय कर्ब कमी होणे, अमिनीतील पोषक तत्त्वे कमी होणे आणि रासायनिक खतांचा अतिवापर करणे, जंगलतोड, मातीची झीज, अति चराई आणि खराब पाणी व्यवस्थापन, खराब मातीची रचना, एकच पीक घेणे आदी कारणे जमिनीची सुपीकता कमी करतात. या बाबींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊन नियोजनाची गरज आहे. 

Web Title: Latest News Agriculture News To increase soil fertility, pay attention to 'these' things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.