Join us

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:06 IST

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत.

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत.

गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक नुकसान या चार दिवसांत झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. ८० हजार शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत.

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांमधील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. ३३ टक्क्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

पावसाचे पाणी शेतांमध्ये जाऊन शेतांमधील पिके अक्षरशः बाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. याआधी सप्टेंबर महिन्यातच झालेल्या पावसामुळे ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

हेही वाचा : शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव

English
हिंदी सारांश
Web Title : Jalgaon: Heavy Rains Destroy Crops on 57,000 Hectares, Affecting 80,000 Farmers

Web Summary : Heavy rains in Jalgaon district destroyed kharif crops across 57,000 hectares in eight talukas. Approximately 80,000 farmers have been affected by this massive crop damage, the worst in the last four months.
टॅग्स :जळगावपाऊसपीकशेती क्षेत्रशेतकरीशेती