अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील महान व आसपासच्या भागातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे.
यावर्षी चांगल्या पावसामुळे धरणे व तलाव भरले तसेच विहिरी व बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध राहिले. त्यामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू व हरभरा पेरणी केली.
नोव्हेंबरमध्ये पेरणी झालेल्या हरभरा पिकाची कापणी सुरू असून, त्या पिकाला समाधानकारक उत्पादन मिळत आहे; मात्र डिसेंबरमध्ये पेरणी केलेल्या पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे पिवळी पडून सुकली. काही भागांत शेंगा कमी लागल्यानेही उत्पादन घटले.
४ हजार रुपये सोंगणीचा दर
यंदा महान व परिसरात हरभरा पेरणीचे क्षेत्र वाढल्याने काढणी हंगामात मजुरांच्या मजुरी दरात वाढ झाली आहे. खेडेगावांतील मजूर हरभरा सोंगणीसाठी महान येथे येत असून, एका एकरासाठी ४ हजार रुपये मजुरी आकारली जात आहे. याशिवाय ये-जा खर्चही शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. मजुरी दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर खर्च व्यवस्थापनाचे आव्हान उभे ठाकले आहे.
कुठे आनंद, कुठे निराशा!
शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, वेळेवर पेरणी, रोगनियंत्रण उपाययोजना व शिफारसीय वाणांचा वापर केल्यास उत्पादनात स्थैर्य मिळू शकते. सध्या परिसरात 'कुठे आनंद, तर कुठे निराशा' अशी स्थिती दिसून येत आहे.
प्रतिएकर १ हजार रुपयांची वाढ
अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची चर्चा गतवर्षी एकरी सोंगणीचा दर सुमारे ३ हजार रुपये होता. त्या तुलनेत यंदा प्रतिएकर १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या मजुरीमुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आहे.
