माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती.
नुकतीच माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक झाली यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करिश्मा सिद्ध केला.
गुरु-शिष्यांच्या सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले.
गाळप हंगाम २०२४-२५ म्हणजे यंदाचा अंतिम ऊस दर देणे अजून बाकी आहे. निवडणुक झाली आता दर अजून वाढवून मिळणार का? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
मागील १० वर्षात माळेगाव कारखान्याने उसाला दिलेला दर
हंगाम | दर (रु.) |
२०१५-१६ | २,८०० |
२०१६-१७ | ३,१०० |
२०१७-१८ | २,९०० |
२०१८-१९ | ३,४०० |
२०१९-२० | २,७५० |
२०२०-२१ | २,७५० |
२०२१-२२ | ३,१०० |
२०२२-२३ | ३,४११ |
२०२३-२४ | ३,६३६ |
२०२४-२५ | ३,३३२ (अंतिम दर देणे बाकी) |
अधिक वाचा: Pik Vima Hapta : यंदा पीकविमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे; वाचा सविस्तर