Jalna : मृग बहाराच्या विविध फळपिकांचा विमा काढण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ येत्या ४८ दिवसांत संपणार असून, ज्या शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा काढायचा आहे, त्यांनी पुढील दोन दिवसांत विमा भरावा लागणार आहे. मात्र, शासनाने दिलेली वेबसाइट सुरळीत चालत नसल्याने फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फळपीक विमा काढण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. पेरणीचा हंगाम सोडून अनेक शेतकरी गावासह तालुक्यातील ग्राहक सेवा केंद्राबाहेर रांगा लावत आहेत.
दरम्यान, वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. त्यातच वीज गेल्यास मात्र अनेक शेतकऱ्यांना तासन् तास रांगेत उभे राहूनदेखील फळपीक विमा न भरताच माघारी परतावे लागत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र शासनाने यापूर्वीच शेतकऱ्यांना फळपिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का हा मोठा प्रश्नच आहे.
फार्मर आयडी आवश्यक
विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी अनिवार्य क करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी त. फार्मर ओळखपत्र काढलेले नाही, त्यांना मृग बहार फळपीक विम्याचा हप्ता भरता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विमा योजनेची जागृती गरजेची
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना विविध फळपिकांसाठी फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच चांगली आहे, या दुमत नाही. मात्र, फळ उत्पादक शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या धोक्याच्या नोंदी कशा घेतल्या जातात याबद्दल जागृती होणे महत्त्वाचे आहे. ही केंद्रे कुठे कुठे आहेत, याची माहिती प्रकाशित होणे गरजेचे आहे. तसेच ती कार्यरत आहे की नाही अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ग्राहक सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
फळपीक विमा भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. याचाच फायदा घेत काही ग्राहक सेवा केंद्रचालक शेतकऱ्यांकडून फार्मर आयडी तयार करून देणे, फळपीक विमा भरणे, केवायसी करून देण्यासाठी ७० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत रक्कम घेत आहेत. यामुळेदेखील शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत. मात्र वेळे अभावी नाविलाजाने कुठेही वाच्यता न करता शेतकरी ग्राहक सेवा केंद्र चालकास पैसे देत आहेत. शेतकऱ्यांची होणारी लूट 3 थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
'या' पिकांचा समावेश
मृगबहारमध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, चिकू, पेरू, सीताफळ आणि लिंबू या आठ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांमध्ये तर आंबे बहार २०२५-२६ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई आणि स्ट्रॉबेरी या नऊ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये हवामान धोक्याच्या निकषानुस योजना राबविली जात आहे.
द्राक्ष, लिंबू, संत्रा, पेरू, मोसंबी आणि चिकू या फळपिकांचा विमा काढण्यासाठी ३० जून ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. डाळिंब १४ जुलै, सीताफळ ३१ जुलै अशा वेगवेगळ्या फळपिकांसाठी तारखा देण्यात आलेल्या आहेत. त्यामु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- विष्णू राठोड, तालुका कृषी अधिकारी