राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येते.
सन २०२४-२५ मध्ये या योजनेत शेतकरी निवडीचे निकषांमध्ये शेतकरी किमान बारावी पास असावा व वयोमर्यादा वय वर्षे २५ ते ६० असावी हे प्रमुख निकष होते.
मा.आयुक्त कृषी यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती बैठकीमध्ये या निकषांत बदल करण्यात आले असून किमान शिक्षणाची अट व कमाल वय साठ वर्षे हि अट रद्द करण्यात आली आहे.
महिलांचेशेतीतील अमूल्य योगदान लक्षात घेता सन २०२५-२६ या वर्षात महिला शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळावी या उद्देशाने या योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
सदर योजनेत सन २०२४-२५ मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड या देशांची परदेश अभ्यास दौऱ्याकरिता निवड करण्यात आली होती.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समवेश करण्यात आलेला आहे.
या योजनेंतर्गत शेतकरी निवडीचे निकष, सन २०२५-२६ करिता दौरा देश या बाबींमध्ये बदल केल्यामुळे सन २०२४-२५ मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात येत आहे.
तथापि ज्या शेतकऱ्यांची पूर्वी निवड झालेली होती ते नव्याने अर्ज करू शकतात व पात्रतेनुसार त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाईल.
अधिक वाचा: विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर