नांदेड : निसर्गाशी घट्ट नाते असलेल्या ग्रामीण भागातील लोक हवामानातील सूक्ष्म बदल पक्ष्यांच्या वर्तनातून ओळखतात. पावसाच्या आगमनाच्या काळात काही विशिष्ट पक्ष्यांचे आवाज, हालचाल आणि वर्तन हे पावसाचे संकेत देणारे मानले जातात. हे निरीक्षण नवीन नाही, अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे. हवामान खाते जसे उपग्रह आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पावसाचा अंदाज वर्तवते.
'तितुर'चे संदेशहवामानात बदल होत असल्याचे संकेत 'कोकीळ'च्या गोड स्वरातून, 'कावळ्या'च्या टोळक्यांतील ओरडण्यातून आणि 'चिमणी'च्या चपळ हालचालीतूनही मिळतात. 'तितुर' पक्ष्याचा 'कोड्यान केको, कोड्यान केको' असा विशेष स्वर शेतकऱ्यांमध्ये अत्यंत विश्वासार्ह मानला जातो.
आफ्रिकेतून स्थलांतर करून येणारा 'चातक' पक्षी 'पिऊ पिङ्गा असा स्वर काढतो. शास्त्रज्ञांच्या मते, हा पक्षी केवळ आकाशातून पडणाऱ्या पहिल्या थेंबाची प्रतीक्षा करतो. त्याचे हे वर्तन अनेक वर्षांच्या नोंदीतून सिद्ध झाले आहे आणि त्याच्याही स्वरावरून पावसाचे आगमन समजते.
'नवरंग'चे बदलाचे इशारे'नवरंग' पक्ष्याचा आवाज हवामानात बदल होण्याची नांदी असते, असे पक्षी निरीक्षक सांगतात. त्याचा सशक्त, विशिष्ट आवाज ऐकू यायला लागल्यास वातावरण बदलत असल्याचे मानले जाते. शेतकऱ्यांच्या अनुभवातून या निरीक्षणाला अधिक बळकटी मिळाली आहे. 'तिबोटी खंडवा', 'निळ्या कानाचा खंडता', 'छोटा खंड्या' हे पक्षी जलस्रोताजवळ फिरतात. त्यांची वाढलेले हालचाल पावसाचे संकेत देतात. निसर्गातले काही पक्षी नैसर्गिक संवेदनांच्या आधारे हवामानातील बदल संकेत स्वरूपात देतात.