Join us

शेतकरी, मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापरण्याचे कृषी अभ्यासकांचे आवाहन; वाचा काय आहेत फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:33 IST

Crop Rotation : नगदी पैसा हाती येतोय या नादात सध्या शेतकरी त्याच जागेवर एकाच पिकाचे वाण वारंवार घेत असल्याने ही एक पीक पध्दती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

नगदी पैसा हाती येतोय या नादात सध्या शेतकरी त्याच जागेवर एकाच पिकाचे वाण वारंवार घेत असल्याने ही एक पीक पध्दती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांनी सर्वाचे आणि शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीक पध्दतीचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे.

सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणे शेतीची उत्पादन क्षमता घटण्यास कारणीभूत ठरत आहे. यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकरीत वाण आल्याने एकाच जमिनीवर दोनपेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, उडीद हेच पीक वारंवार घेतले जाते. परंतु, शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके टाळली जात आहेत.

तृणधान्ये, ज्वारी, बाजरी, मका, पिवळी ज्वारी, तांदूळ, भगर, राळे, कडधान्य मूग, मटकी, चवळी, मसूर, वटाणा यांसह तेलबिया जवस, करडी, भुईमूग, कारळाकडे पाठ फिरवली जाते. भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली, करटुले या पालेभाज्या आणि आंबा, पेरू, चिकू, अंजीर, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आदी अन्नघटकात आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

मात्र, याकडे सरळ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. संमिश्र पीक पध्दतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल. तसेच शेतीची प्रतसुध्दा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

चक्री पद्धतीने करावा पेरा

शेतकरी बांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पीक पद्धती वापरावी. रानभाज्याचे महत्त्व ओळखून त्यादेखील जतन कराव्यात. - राजेंद्र नेटके, कृषी अधिकारी, शिरुर का. जि. बीड. 

मधुमक्षिका पालन करा

शेतीच्या धारण क्षेत्रात घट होत आहे. यासाठी अंतरपीक पध्दती आणि जोडधंदा म्हणून रेशीम लागवड, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन याकडेही शेतकऱ्यानी लक्ष केंद्रित करावे. - सुरेश घोळवे, तहसीलदार, शिरूर कासार जि. बीड. 

हेही वाचा : जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतकरीशेतीखरीपशेती क्षेत्रलागवड, मशागतपीक