Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी चराईचे वेळापत्रक बदलणे (सकाळी लवकर/संध्याकाळी उशिरा), सकस चारा व भरपूर स्वच्छ पाणी देणे, आणि सावलीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दररोज २-३ तास चराई करून साखर-मीठ-हळद मिश्रित पाणी पाजल्यास शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
शेळी - उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन
- महाराष्ट्रात सर्वसाधारणतः शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात.
- त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान ८ ते ९ किलोमीटर चालावे लागते.
- उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ प्रतीचा चारा शिल्लक असतो.
- अश्यावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही.
- तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना कारावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते.
- तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते.
- काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो.
- म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन :
शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर (५ ते ९ दरम्यान) आणि सायंकाळी उशिरा (५ ते ८ दरम्यान) चराईसाठी सोडावे.
शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी १२ ते ४ या वेळेत दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
