पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल
Updated:May 29, 2025 16:44 IST2025-05-29T16:32:17+5:302025-05-29T16:44:47+5:30

पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.(6 Different Methods to Repel Snakes Naturally)
ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात साप फिरत नाहीत.
घरातल्या एखाद्या खोलीत अडगळीचं सामान ठेवलेलं असेल तर ती खोली व्यवस्थित पॅक करा. त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवू नका. अन्यथा अडगळीमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते.
डांबर गोळ्यांच्या वासाने साप दूर जातो. त्यामुळे जिथून साप येण्याची भीती असते त्या सगळ्याच ठिकाणी डांबर गोळ्या टाकून ठेवा.
घराच्या आजुबाजुला गवतीचहा, झेंडू, कांद्याची पात, लसणाची पात, पुदिना अशी रोपं लावा. या रोपांच्या वासामुळे साप लांब राहण्यास मदत होते.
cedarwood essential oil घ्या आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग पावडर घाला. हे तेल घराच्या आजुबाजुला नियमितपणे शिंपडा. साप दूर पळतील.