पावसाळ्यात घरात कुबट-दमट वास येतो? ५ उपाय- घरात वाटेल प्रसन्न रोज
Updated:June 17, 2025 10:17 IST2025-06-17T10:14:30+5:302025-06-17T10:17:03+5:30
monsoon home freshness tips: how to remove musty smell in rainy season : कपडे घरात वाळत असतील तर घरात यामुळे देखील वास पसरतो. या वासात राहण्याऐवजी घराला सुगंधित करण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरु शकता.

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु पावसामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून वास येतो. आर्द्रता वाढल्याने भिंती ओल्या होतात आणि ओलसरपणा घरात पसरतो, ज्यामुळे कुबट-दमट वास येऊ लागतो.(monsoon home freshness tips)
कपडे घरात वाळत असतील तर घरात यामुळे देखील वास पसरतो. या वासात राहण्याऐवजी घराला सुगंधित करण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरु शकता. (how to remove musty smell in rainy season)
घरातील ओलावा कमी करण्यासाठी स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोरड्या कापडाने घर स्वच्छ करा. जमिनीवर पाणी साचू देऊ नका.
घरात ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवा. कचऱ्यामुळे कुबट वास येतो. तसेच कचरा जास्त वेळ घरात ठेवू नका. तसेच स्वयंपाकघरात ओला कापड ठेवू नका.
दुर्गंधी कमी करण्यासाठी घरात कापूर जाळा यामुळे घरात बुरशी लागणार नाही. तसेच घरातील दमटपणा कमी होईल.
अनेकदा पाऊस नसला तरी वातावरणात ऊन पसरते. अशावेळी घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवा. ज्यामुळे घरात हवा खेळती राहिल.
कडुलिंबाचे अँटीफंगल गुणधर्म आहेत. जे घरातील दमटपणा-बुरशीजन्य गोष्टी लांब ठेवतात. कडुलिंबाची पाने कापडात बांधून घराच्या कोपऱ्यात ठेवा.