‘तो’ हरला-अपयशाने खचला पण ती खंबीर राहिली म्हणून..! विराट-अनुष्का एक दूजे के लिए..
Updated:June 4, 2025 14:22 IST2025-06-04T14:15:04+5:302025-06-04T14:22:53+5:30
'He' lost and was devastated by the failure, but she remained strong..! Virat-Anushka made for each other : विराटच्या यश-अपयशात कायम खंबीरपण सोबत असणारी अनुष्का आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा विराट ही जोडी तर जगात भारी.

असे म्हणतात, प्रेमात फार ताकद असते. प्रेमात पडल्यानंतर व्यक्ती स्वतःच्या काही सवयी सोडून प्रियकराच्या मनानुसार वागण्यात जास्त आनंदी राहतो. चित्रपटांमध्ये अशा प्रेमकथा असतात. त्या आपण पाहतोच. मात्र आपल्या विराट अनुष्काची प्रेमकथा कोणत्या कथानकापेक्षा कमी नाही.
शब्दांपेक्षा कृती जास्त प्रभावी ठरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहलीचे अनुष्काच्या अवती-भोवतीचे वागणे. विराट अनुष्काबद्दल बोलताना फार प्रेमाने तिला मान देऊन बोलतो. मात्र अनुष्काची काळजी घेताना तो सारखा दिसतो. लोकांमार्फत त्यांचे क्युट वागणे सतत टिपले जाते.
विराटच्या अनेक सवयी अनुष्कामुळे बदल्या आहेत. हे विराट स्वत: मान्य करतो. त्यांचा राग, चिडचिड कमी होण्यामागे अनुष्काची मोठी भूमिका आहे. विराटने त्याच्या जुन्या मुलाखतींमध्ये त्याला देवावर विश्वास नाही असेही सांगितले होते. मात्र आता तो अनुष्का सोबत किर्तन व प्रवचनांना बसलेला दिसतो. गॉड्स प्लॅन सारखे शब्द वापरतो. अनुष्कासाठी त्याने स्वत:ला फार बदलले आहे यात काहीच वाद नाही.
गेली अठरा वर्षी विराट आरसीबीला आयपीएल चषक मिळवून देण्यासाठी झटत होता. सध्या विराटची वाहवाह करणारे लोक तेव्हा त्याच्याच नावाने शिवीगाळ करत होते. मात्र अनुष्का कायम त्याच्या सोबत होती. तिलाही भरपूर ट्रोल केले गेले. तरी कधीही ती उदास दिसली नाही. सगळ्या सामन्यांमध्ये विराटची सपोर्ट सिस्टिम बनून अनुष्का हजर असायची.
अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी विश्वास, समर्पण आणि एकमेकांचा आधार कसा बनावे यासाठी प्रेरणादायी आहे. 'विरुष्का' या नावाला चाहत्यांच्या मनामध्ये कायमचे स्थान मिळाले आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम आहेत.
विराट अनुष्काने नात्याची गोपनीयता कायम जपली. त्यांनी कधीही फार गाजावाजा केला नाही. त्यामुळे ते लोकांना कधी ओव्हरहाईप्ड वाटलेच नाहीच. त्यांच्या नात्यातील साधेपणा त्यांच्या नात्याला फार खास बनवतो. एका जाहिरातीसाठी झालेली भेट एवढ्या सुंदर नात्यात रूपांतरित होईल असा विचारही त्यांनी केला नव्हता.
विराट एक खेळाडू म्हणून अनेकांचा आदर्श आहे. मात्र एक नवरा कसा असावा यासाठीही त्याचा आदर्श ठेवणे नक्कीच योग्य ठरेल. विराट अनुष्कावर पक्त प्रेम करत नाही तर अनुष्काचा आदरही करतो. तिच्या निर्णयांचा आदर ठेवतो. विराट कायम अनुष्काच्या कौशल्यांचे कौतुक करताना दिसतो.
सध्या आयपीएल जिंकल्यानंतरची विराट अनुष्काची मिठी सोशल मिडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. विराट जिंकल्यानंतर रडताना दिसला आणि रडत अनुष्काला मिठी मारणाऱ्या विराटला पाहून प्रेक्षणांच्याही डोळ्यात पाणी आले.