नवरात्रीचे उपवास करताना शुगर वाढण्याची भीती वाटते? ९ पदार्थ खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये
Updated:September 24, 2025 17:26 IST2025-09-24T17:21:44+5:302025-09-24T17:26:22+5:30

नवरात्रीचे उपवास करताना साबुदाणा, बटाटा असे पदार्थ वारंवार खाल्ले जातात (Navratri 2025). या पदार्थांमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शुगर वाढण्याची भीती असते. म्हणूनच नवरात्रीचे उपवास करताना शुगर वाढू नयेत यासाठी काही पदार्थ आवर्जून खायला हवेत.
ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉ. पाल मणिकम यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यापैकी पहिला पदार्थ आहे वेगवेगळी फळं. फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सोपी होते. संत्री, पपई, पेरू, टरबूज अशी फळं खाण्यास प्राधान्य द्या.
शरीरातले प्रोटीन्स कमी होऊ देऊ नका. त्यासाठी बदाम, काजू, अक्रोड असा सुकामेवा खा. सुकामेवा मधासोबत खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
आहारातलं दही आणि दूध यांचं प्रमाणही वाढवा. दही आणि दूध या पदार्थांमधूनही प्रोटीन्स मिळतात.
दररोज सकाळी चिया सीड्स, तीळ, जवस असे पदार्थही खा. त्या पदार्थांमुळेही रक्तामधील साखर एकदम वाढत नाही.