महाराष्ट्रीयन 'मुंडावळ्या', पंजाबचा 'चूडा'... भारतातील विविध राज्यातील नवरीचे पारंपरिक दागिने, पाहून प्रेमात पडाल
Updated:March 3, 2025 15:47 IST2025-03-03T15:30:16+5:302025-03-03T15:47:30+5:30
Indian Wedding Jewelry Traditions by State: State-Wise Indian Wedding Jewelry Customs: Traditional Indian Wedding Jewelry Across States: Jewelry Traditions in Indian Weddings: State-Specific Wedding Jewelry in India: Regional Differences in Indian Wedding Jewelry: Wedding Jewelry Rituals in Indian States: Exploring Wedding Jewelry Traditions in India: Cultural Variations in Indian Wedding Customs: भारतातील विविध राज्यात त्याच्या परंपरेनुसार लग्नात दागिने घातले जातात.

लग्न म्हटलं की, विविध प्रातांनुसार त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. त्यात काही विधी या आधुनिकता आणि नाविन्यतेला जोडणाऱ्या. या काळात फक्त नवरा-नवरीच नाही तर दोन कुटुंब एकमेकांशी जोडले जातात. त्याच्या अनेक रितीरिवाजानुसार लग्न पार पडत. (Indian Wedding Jewelry Traditions by State)
हल्ली मुला-मुलींच्या सहमतीने आणि आवडीनुसार जोडीदार निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लव्ह मॅरेज असेल तर लग्न अर्थात दोन पद्धतीने केले जाते. लग्न काळात महिला वर्गांला प्रचंड आवड असते ती दागिने आणि साड्यांची. भारतातील विविध राज्यात त्याच्या परंपरेनुसार लग्नात दागिने घातले जातात. जाणून घेऊया त्याबद्दल (State-Wise Indian Wedding Jewelry Customs)
महाराष्ट्रात नववधुला मुंडावळ्या बांधण्याची पद्धत आहे. मोती किंवा फुलांनी तयार केलेला हा अलंकार वधू-वराच्या कपाळावर बांधला जातो. जो विवाह सोहळ्याचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. (Cultural Variations in Indian Wedding Customs)
पश्चिम बंगालमध्ये लग्नात शंखपोला आणि मुकूट घालण्याची पद्धत आहे. शंखाच्या बांगड्या (शंखा) आणि लाल प्रवाळाच्या बांगड्या (पोला) वाहाचे प्रतीक मानले जाते. तर मुकूट हा नववधूच्या सौंदर्यात भर घालतो.
पंजाबमध्ये लग्नात नववधुने लाल चूडा आणि कलीरे घालण्याची प्रथा आहे. या चूड्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आणि लटकत्या अलंकाराचा कलीरे. हे दागिने नवीन नवरीच्या वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दर्शवतात.
हिमाचल प्रदेश हा आपल्या देशातील संस्कृती आणि सुंदरतेसाठी ओळखला जातो. यांच्या लग्न सोहळ्यात पारंपरिक चिरी टिक्का, नाकात नथनी असते.
राजस्थानी वधूच्या कपाळावर मिरवणारा गोलाकार मांगटिक्का अर्थात बोरला नववधूचे प्रतिक दर्शवितो. यामुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.
काश्मीर मधील स्त्रियांच्या कानात पारंपरिक दागिने असतात. यामध्ये देजहूर, अथूर आणि अत: या तीन भागांचा संगम आहे.
उत्तराखंडमध्ये नववधुला नथुली घालण्याची प्रथा आहे. मोत्यांनी आणि रत्नांनी जडलेली भव्य नथ ही तिच्या विवाहाचे प्रतिक दर्शविते.
मणिपूरमध्ये नवरीला लिकचो हे कानातले आणि गळ्यातल घातले जाते. ही प्रथा त्यांचा सांस्कृतिक वारसा जपण्याची आहे असे म्हटले जाते.