केस एवढे गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते? 'हे' पाणी वापरा- केस गळणं थांबेल
Updated:June 12, 2025 14:42 IST2025-06-12T14:36:24+5:302025-06-12T14:42:43+5:30

हल्ली केस गळण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. काही जणांचे केस तर एवढे जास्त गळतात की टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते.
म्हणूनच आता अशा सगळ्याच लोकांसाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो. यामुळे केस गळणं तर कमी होईलच पण केसांना इतरही अनेक फायदे होऊ शकतील. हा उपाय कसा करायचा याविषयीची माहिती kailashayogastudiorishikesh या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी १ चमचा मेथी दाणे घ्या. मेथी दाण्यांमुळे केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते.
त्यामध्येच १ चमचा कलौंजी घाला. कलौंजीमुळे केस कमी वयातच पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.
आता या मिश्रणात ५ ते ६ लवंग घाला. लवंग घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं तसेच डोक्याच्या त्वचेला असणारं इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. यामुळे डोक्यातला कोंडा कमी होतो.
आता सगळ्यात शेवटी या मिश्रणात कडिपत्त्याची ८ ते १० पानं घाला. केसांची चांगली वाढ होण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यासाठी कडिपत्ता उपयुक्त ठरतो. आता १ ग्लास पाण्यामध्ये वरील सगळे पदार्थ रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्री झोपण्यापुर्वी हे पाणी केसांच्या मुळाशी लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून घ्या.
काही दिवस नियमितपणे हा प्रयोग केल्यास केसांमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.