विजयालक्ष्मी मणेरीकर
फेसबूक व्हॉट्सॲप उघडावेसे वाटत नाहीये. धीर खचत चाललाय. मिनिटा मिनिटाला ओळखी अनोळखी चेहऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहावी लागतीयं. आता ते शब्दही नकोसे वाटाहेत. हृदयाप्रमाणे अश्रूही शुष्क होतायतं. टायटॅनिक चित्रपटाच्या शेवटच्या क्षणांमध्ये दिसणारी व्हायोलीन वादकांची मृत्यूला कवटाळून टाकणारी विदारक तल्लीनता कशी आणू? मनाच्या सगळ्या संवेदना बाजूला ठेवून मनोरंजन तरी कसे करू? कोणाचे करू?प्रत्येक जण आतून भेदरलेला आहे. खोटेच अवसान आणून चेहऱ्यावर स्थितप्रज्ञता आणतोय.पुराणातली एक कथा आठवतेय.समुद्रमंथनावेळी देव आणि दानवांची समेट घडवून आणून अमृतकुंभ मिळवण्यात यश मिळाले, असे सांगितले जाते. समुद्रमंथनावेळी देव आणि दानव या दोघांनी वासुकी सर्पाला वारंवार घुसळल्यामुळे त्याच्या मुखातून मोठ्या प्रमाणात विष व धूर बाहेर पडू लागला. या विषाच्या दर्पाने देव आणि दानव दोघेही मृत्यूस शरण जावू लागले. भगवान महादेवांनी हे विष प्राशन केले. देव आणि दानवांना मोठ्या विषप्रादुर्भावापासून वाचवले पण आता या कलियुगात कोण महादेवाला जागृत करणार? तेंव्हा युद्ध देव आणि दानवांत होते आता असा फरक राहिलाय? आता हे बळी थांबणार का? आता अमृतकुंभ कोण आणणार?
जगत में झूठी देखी प्रीत।अपने ही सुखसों सब लागे, क्या दारा क्या मीत॥मेरो मेरो सभी कहत हैं, हित सों बाध्यौ चीत।अंतकाल संगी नहिं कोऊ, यह अचरज की रीत॥मन मूरख अजहूँ नहिं समुझत, सिख दै हारयो नीत।नानक भव-जल-पार परै जो गावै प्रभु के गीत॥
पंडितजी आपणास श्रद्धांजली कशी वाहू? हिम्मत होत नाही. ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या आत्म्यास शांती लाभो.