"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:57 IST2025-11-04T19:55:23+5:302025-11-04T19:57:22+5:30
महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. अनेक प्रश्नावर निवडणूक आयोगाला समाधानकारक उत्तर देता आली नाही. या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंनी आयोगाला सुनावले.

"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
Raj Thackeray on Local Body Election: "आता १०० टक्के खात्री पटली की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे", अशी संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर निरुत्तर राहिलेल्या निवडणूक आयुक्तांकडे बोट दाखवत राज ठाकरे यांनी निवडणूक आय़ोगाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केला.
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतील आयुक्तांच्या उत्तराचा व्हिडीओ पोस्ट केला.
राज ठाकरे म्हणाले, 'तळपायाची आग मस्तकात गेली'
"आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १०० टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे", अशा शब्दात राज ठाकरेंनी आयोगावर निशाणा साधला.
मग तुमच्या पदांचं काय करायचं? राज ठाकरेंचा सवाल
"दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यांवर प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय?", अशा शब्दात राज ठाकरेंनी आयोगाला सुनावले.
राज ठाकरे म्हणाले, 'ही क्लिप जरूर पहा'
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
"महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन", असे राज ठाकरे म्हणाले आहेत.