मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 09:48 IST2025-08-18T08:38:14+5:302025-08-18T09:48:59+5:30
Mumbai Building Collapse: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अशातच मुंबईत आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ...

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
Mumbai Building Collapse: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अशातच मुंबईत आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील चिरा बाजार येथील एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मरीन लाईन्सच्या चिराबाजार भागातील एका निवासी इमारतीत ही घटना घडल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी संध्याकाळी ७:४३ वाजता चिरा बाजारातील एका निवासी इमारतीच्या जिन्याचा काही भाग अचानक कोसळला. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमिनीपासून दुसऱ्या मजल्यापर्यंत जाणाऱ्या जिन्याचा काही भाग कोसळला. बांधकामातील दोषांमुळे किंवा इमारतीतील सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे जिना कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक रहिवासी आणि परिसरातील लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
#WATCH | Mumbai: Three people were injured after a portion of the staircase of a building collapsed in the Chira Bazaar area yesterday.
— ANI (@ANI) August 18, 2025
(Visuals from the spot) pic.twitter.com/B45ftDPTX6
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाने शिडीचा वापर करून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी जवळपासचे लोकही घाबरले होते. अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांच्या पथके बचाव कार्यात सक्रिय आहेत. अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे प्राधान्य आहे. घटनेच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.