मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतरही मनसेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सोनिया गांधींची भेट घेत नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले होते. दरम्यान, आता देशातील सद्यस्थिती पाहता मनसेकडून बॉम्ब वाटप करण्यात येणार असल्याचा दावा करून मनसेने खळबळ उडवून दिली आहे. 'देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप' असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता निर्माण झाली असून, बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर आम्ही अभिजीत पानसेंशी संपर्क साधला. तेव्हा, 'हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या', असं ते म्हणाले.
अभिजीत पानसे यांनी फेसबूकवर शेअर केलेली यासंदर्भातील पोस्ट