'त्या' दिवशी शिवसेनेचा विषय संपेल; पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 13:31 IST2019-10-14T13:30:07+5:302019-10-14T13:31:10+5:30
विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला होता.

'त्या' दिवशी शिवसेनेचा विषय संपेल; पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही!'
मुंबई - माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरे पर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल अशा शब्दात निलेश राणेंनी ट्विट केलं आहे.
शिवसेनेच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांच्या पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात राणे कुटुंबीयांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरु होती. मात्र निलेश राणे याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे या नितेश राणे यांच्या वक्तव्याशी मी अजिबात सहमत नाही असं निलेश राणेंनी सांगितले होते.
कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरे पर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 14, 2019
शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युतीधर्म मोडून येथे आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला आहे. मात्र असे असले तरी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला होता.
निलेश राणेंनी सांगितलं होतं की, ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार. पण त्यानंतर ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तर दुसरीकडे नारायण राणे यांनीही सिंधुदुर्गात भाजपाच्या तिन्ही जागा निवडून येतील असं सांगत शिवसेनेबद्दल बोलताना सांगितले होते की, राणे आणि शिवसेना यांच्यातील कटुता एकाबाजूने संपणार नाही तर त्यासाठी दोन्ही बाजूंनी तशी भूमिका घ्यायला हवी असं सांगत भूमिका घेतली आहे.
...पण वार मी समोरुनच करणार; राणे पुत्रांमधील मतभेद चव्हाट्यावर? @meNeeleshNRane#महाराष्ट्रविधानसभानिवडणूकhttps://t.co/TwsKGSTH6X
— Lokmat (@MiLOKMAT) October 14, 2019