राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. सध्या याच प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. राजाची पत्नी सोनम हिला बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रात्रीच तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सोनमसोबतच इतर चार आरोपीही न्यायालयात हजर राहणार आहेत. तत्पूर्वी, सीमा हैदर हिचे वकील एपी सिंह यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे आपले नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका वृत्त वाहिणीवर काही प्रश्नांना उत्तर देताना एपी सिंह म्हणाले, "इस्लाम धर्म अद्यापही योग्य आहे. या धर्मात अशा घटना दिसून येत नाहीत. मेरठ येथील घटनेनंतर, हे हत्याकांड झाले. आपली परंपरा अशी कधीही नव्हती. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे आणि आपण त्याचे नुकसान करत आहोत. आपण व्हॅलेंटाईन डे आणि लव्ह डेला विनोदात घेत होतो. मात्र, यामुळे आधुनिकता प्रचंड वाढली आहे."
सोनमला फाशी द्या, विपिन रघुवंशीची मागणी -राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पत्नी सोनम आणि इतर आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात, राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने मेघालय पोलीस आणि प्रशासनाकडे सोनम आणि तिला साथ देणआऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, वकिलांनी सोनमची केस लढू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.