मुंबई- मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झल्याचे वृत्त आहे. यावर पंतप्रधान मोदींनी (Naredra Modi) दुःख व्यक्त केले असून मदतीची घोषणा केली आहे. (Rains in Mumbai 17 killed in Chembur and Vikhroli; The Prime Minister expressed his sorrow and announced help)
यावर दुःख व्यक्त करताना मोदी म्हणाले, 'मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये भिंत कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाल्याने दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबासोबत आहेत. यात जे लोक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.' यावेळी त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा केली.
विक्रोळी भागात इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू - मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झल्याचे वृत्त आहे. तर 5 ते 6 लोक यात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागांला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.