Join us

Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:50 IST

Mumbai Local Railway Accident: मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबई लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.

मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना अत्यंत दुर्देवी घटना घडली. य या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेवर रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आपोआप दरवाजे बंद होणार्‍या नव्या लोकलचा समावेश केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली

या घटनेनंतर स्वप्नील निला यांनी पत्रकारांशी संवाद साधला."मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासून खाली पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. 

अपघातानंतर मध्य रेल्वेने घेतलेले महत्त्वाचे निर्णय- नव्या गाड्यांचे दरवाजे आपोआप बंद होणार- सध्याच्या गाड्यांमध्येही आपोआप बंद होणारे दरवाजे लावण्यात येतील. - कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाइन तर, कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाइन नियोजित- ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाइनपर्यंत अपग्रेड करणार- सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईन न ठेवता वेगवेगळे इन- आऊट टाईम ठेवण्याची सूचना

रेल्वे अपघातातील मृतांच्या संख्येत वाढमिळालेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेवर ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर १ जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान रेल्वे अपघातात आतापर्यंत एकूण ६६३ जणांचा मृत्यू झाला. यातील २७२ जण धावत्या लोकलमधून पडल्याने आणि ३९१ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईअपघातमहाराष्ट्ररेल्वे अपघात