मुंबई : शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा सुरू केली, त्यावरून त्यांना लोकांपर्य़ंत पोहोचायचे आहे. आदित्य यांना मी लहानपासून ओळखतो. वयात फरक असला तरीही आम्ही चर्चा करतो. लोकांना समजून घेण्याची त्यांची शक्ती मोठी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरही भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे बरेचजण जागावाटपावर त्यांची मते मांडत आहेत. मुख्यमंत्री पदाची इच्छा एखाद्याने व्यक्त केली त्यात गैर काय. केंद्रात मोदी सरकार आहे. यामुळे महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे, असे राऊत म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे बोलतील तेच आम्ही ग्राह्य धरू, अन्य कोणी काय बोलते ते त्यांचे मत असते. यामुळे विधानसभा युतीमध्येच लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.