मुंबईवरील पाणीकपात लवकरच होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 06:28 IST2019-07-16T01:27:48+5:302019-07-16T06:28:46+5:30
तलावांमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाण्याची पातळी सतत वाढत असून तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा जमा झाला आहे.

मुंबईवरील पाणीकपात लवकरच होणार रद्द
मुंबई : तलावांमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाण्याची पातळी सतत वाढत असून तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गेले आठ महिने मुंबईत सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात लवकरच रद्द होणार आहे.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्षी नऊ टक्के जलसाठा कमी असल्याने मुंबईत १५ नोव्हेंबर २०१८ पासून सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. गेले आठ महिने मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मात्र जुलै महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात चांगला जोर धरल्याने तलावांची पातळी झटपट वाढली आहे. तलावांमध्ये आता जवळपास ५० टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात लवकरच मागे घेतल्याचे पालिका प्रशासन जाहीर करणार आहे.
>१५ जुलै २०१९ (दशलक्ष लीटर्स)
तलाव शिल्लक २४ तासांतील
जलसाठा पाऊस (मिमी)
अप्पर ० १०
वैतरणा
मोडक सागर ११०२०६ १७
तानसा ११०१४६ ११
मध्य वैतरणा १३२८७६ ११
भातसा ३२०६४९ ०८
विहार १५८३७ ०
तुळशी ८०४६ २