Join us

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 01:17 IST

पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला असून, प्रवासातही तो रौद्र स्वरूप धारण करणार आहे.

मुंबई : जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला असून, प्रवासातही तो रौद्र स्वरूप धारण करणार आहे. 19 सप्टेंबरला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे उद्या मुंबईसह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातील शाळा उद्या बंद राहणार आहेत.

टॅग्स :आशीष शेलारपाऊस