कोरोना काळातील राज्यात निर्माण झालेला वीजबिलाचा प्रश्न अद्यापही मिटलेलना नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोरोनाकाळातील वीजबिलांवरून आक्रमक पवित्रा घेतला असून वाढीव वीज बिलांबाबत मनसेनं मुख्यमंत्र्यांनाही सवाल केला आहे. "मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?," अशा आशयाचे बॅनर मनसेनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर लावले आहेत. "मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?" असं म्हणत मनसेनं पुन्हा एकदा वीज बिलांच्या मुद्द्याची आठवण करून दिली आहे. तसंच या बॅनरवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
"महोदय गोड बोलता बोलता नववर्ष आलं पण...", वीज बिलांवरून मनसेची बॅनरबाजी
By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 17:36 IST
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे बॅनर, अनोख्या शब्दांत दिल्या शुभेच्छा
महोदय गोड बोलता बोलता नववर्ष आलं पण..., वीज बिलांवरून मनसेची बॅनरबाजी
ठळक मुद्देकोरोनाकाळातील वाढीव वीज बिलांवरून मनसेचा आक्रमक पवित्रा