Mamata Banerjee In Mumbai: “शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला”; ममता बॅनर्जींचा मुंबईत BJP वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:02 PM2021-12-01T16:02:26+5:302021-12-01T16:03:39+5:30

Mamata Banerjee In Mumbai: तुम्ही सातत्याने मैदानात उतरुन भाजपसोबत लढत राहायला हवे, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला.

Mamata Banerjee In Mumbai: "Shahrukh Khan was politically victimized"; Mamata Banerjee attacks BJP in Mumbai | Mamata Banerjee In Mumbai: “शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला”; ममता बॅनर्जींचा मुंबईत BJP वर हल्लाबोल

Mamata Banerjee In Mumbai: “शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला”; ममता बॅनर्जींचा मुंबईत BJP वर हल्लाबोल

Next

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुंबई दौऱ्यावर असून, अनेक नेतेमंडळींच्या त्या भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

या कार्यक्रमाची सुरुवात करताना ममता बॅनर्जी यांनी आपल्या संवादाची सुरुवात मराठीतून केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, सांस्कृतिक केंद्र आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पूल आहे. महाराष्ट्र आणि बंगालचे नाते चांगले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य होईल, असे मतही ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला, असा मोठा आरोप करत, भाजप हा क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याची बोचरी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली. याशिवाय, चित्रपट दिग्दर्शक महेश भट तुम्हाला लक्ष्य करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढले आणि बोलले पाहिजे. तुम्ही आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या, असा आवाहनही ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे

तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावे लागले. जेणेकरून इतरही प्रादेशिक पक्ष बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या विशेष कार्यक्रमाला स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा उपस्थित होते. 
 

Web Title: Mamata Banerjee In Mumbai: "Shahrukh Khan was politically victimized"; Mamata Banerjee attacks BJP in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.