खर्च वाढला; मुंबईकरांचे केंद्र सरकारला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:46 IST2026-01-31T06:44:15+5:302026-01-31T06:46:07+5:30
Mumbai News: येत्या रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अन्नधान्य, इंधन, औषधे तसेच शिक्षण, आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाढत्या किमतींमुळे घरखर्चाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

खर्च वाढला; मुंबईकरांचे केंद्र सरकारला साकडे
मुंबई - येत्या रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अन्नधान्य, इंधन, औषधे तसेच शिक्षण, आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाढत्या किमतींमुळे घरखर्चाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून थेट दिलासा मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नोकरदार असलेल्या नितीन लता वामन यांनी सांगितले, अत्यावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. एकूणचमहागाईचा ताण कमी करणारा, बचतीचे संरक्षण करणारा आणि सर्वसामान्यांचे जीवन परवडणारे बनवणारा अर्थसंकल्प मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अधिक व्याज दर देण्याची मागणी
राजेंद्र घाडगे हे नोकरदार असून त्यांनी आयकर भरण्याची सध्याची १२ लाख रुपयांची मर्यादा किमान १६ ते १८ लाखांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गृहिणी संध्या मनोहर पारायणे यांनी स्वयंपाकाच्या गॅसदरात कपात आणि जीवनावश्यक
वस्तूंवरील जीएसटी
कमी करण्याची मागणी केली. गृहिणी संपदा सावंत यांनी निवृत्तिवेतनधारकांना ठेवीवर अधिक व्याज दर द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
