Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: 'त्या' मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होता कामा नये; राज ठाकरेंच्या हिंदू बांधवांना स्पष्ट सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 22:55 IST2022-05-03T21:12:23+5:302022-05-03T22:55:05+5:30
Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: देशात इतकी कारागृहं नाहीत की...; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा; भोंग्याचा वाद तापणार

Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: 'त्या' मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होता कामा नये; राज ठाकरेंच्या हिंदू बांधवांना स्पष्ट सूचना
मुंबई: तुम्ही धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या ज्या ज्या मशिदींच्या भोंग्यांमधून अजान, बांग ऐकू येईल, त्या त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा. भोंग्यांमुळे काय त्रास होतो, ते त्यांनाही कळू दे, अशा शब्दांत राज यांनी इशारा दिला आहे. एका पत्राच्या माध्यमातून राज यांनी सर्व हिंदूंना मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध संघर्ष करण्याचं आवाहन केलं आहे.
'त्या' लोकांचं स्वागत; हिंदू बांधवांनी काळजी घ्यावी
सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन राज यांनी केलं आहे.
देशात इतकी कारागृहं नाहीत की...
देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही, असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.
एकदाचा फैसला होऊन जाऊ दे
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे.