मुंबईः पॅकेज का नाही दिलं, असा प्रश्न काही जण विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत केली, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली. पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही; असं म्हणत पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख रुग्ण महाराष्ट्रात असतील, असा अंदाज त्या केंद्रीय पथकानं व्यक्त केला होता. ३३ हजार ७८६ पॉझिटिव्ह रुग्ण हे सध्या महाराष्ट्रात आहेत. सव्वा लाख रुग्णांचा अंदाज असताना राज्यात ३३ हजार रुग्ण आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी परतल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. ४७ हजार १९० रुग्णांपैकी ३३ हजार फक्त पॉझिटिव्ह आहेत. राज्यात साडेतीन लाखाच्या आसपास टेस्ट झालेल्या आहेत. याच्या पुढची लढाई आणखी बिकट होणार आहे. हा गुणाकार जीवघेणा होणार आहे. पण घाबरण्याचं कारण नाही. आपण आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करत आहोत.
हेही वाचा
भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार
Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल
Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश
दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ
मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला
लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं