CoronaVirus News: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; ३१ मेनंतर निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:18 AM2020-05-29T03:18:53+5:302020-05-29T06:25:33+5:30

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्च रोजी संपले होते आणि पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली होती.

CoronaVirus News: Decision to be made after 31 minutes Online option too | CoronaVirus News: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; ३१ मेनंतर निर्णय होणार

CoronaVirus News: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; ३१ मेनंतर निर्णय होणार

Next

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. ते एक तर पुढे ढकलले जाईल किंवा रद्द होऊ शकते.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्च रोजी संपले होते आणि पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाचा संकटकाळ असल्याने अधिवेशनाबाबत अनिश्चितता आहे. 02 अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांचे अंतर नियमानुसार असावे लागते. अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्च रोजी संपले होते, याचा अर्थ पावसाळी अधिवेशन सप्टेंबरपर्यंत घेता येऊ शकेल.

22 आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी अधिवेशन घ्यावे, असा प्रयत्न असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन रद्द करण्याचाही विचार होऊ शकतो. याआधी अधिवेशन रद्द करण्याचे प्रसंग घडलेले आहेत.

Web Title: CoronaVirus News: Decision to be made after 31 minutes Online option too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.