लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होत असल्याची केवळ चर्चा होते, मात्र हा टक्का वाढवण्यासाठी तुमच्याकडे ठोस आराखडा आहे का? गेल्या २० वर्षांत ज्यांची सत्ता होती, त्यांनी महापालिकेचा उपयोग मराठी माणसाला घर आणि रोजगार देण्यासाठी का केला नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
विक्रोळीतील पार्क साइट परिसरात झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा आगामी आराखडाही मांडला. महापालिकेच्या मालकीच्या तसेच मोकळ्या जागांचा वापर मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी केला पाहिजे. तसेच नागरिकांनी भरलेला कर हा लूटमारीसाठी नव्हे, तर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वापरला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
Web Summary : Prakash Ambedkar criticizes past administrations for failing to prioritize housing and jobs for Marathi speakers in Mumbai. He proposes utilizing municipal land to increase the Marathi population and improve living standards with taxpayer money.
Web Summary : प्रकाश आंबेडकर ने मुंबई में मराठी भाषियों के लिए आवास और नौकरियों को प्राथमिकता देने में विफल रहने के लिए पिछली सरकारों की आलोचना की। उन्होंने मराठी आबादी बढ़ाने और करदाताओं के पैसे से जीवन स्तर में सुधार के लिए नगरपालिका भूमि का उपयोग करने का प्रस्ताव रखा।