कोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 02:58 IST2020-09-28T02:58:05+5:302020-09-28T02:58:24+5:30
२२ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे नोंद झाले आहेत

कोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोना, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २८ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विविध आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयातून ही आकारणी करण्यात आल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले.
२२ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे नोंद झाले आहेत. त्याबाबत ३७ हजार ४२ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर गुन्हांसाठी संबंधितांकडून २८ कोटी ४० लाख ६० हजार २६४ रुपये दंड वसूल करण्यात आला.