मध्यरात्री १ वाजता गच्चीवर गेला, सकाळी बॉडी सापडली; मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:35 IST2026-02-04T16:25:56+5:302026-02-04T16:35:31+5:30

मुंबईमधील आयआयटीमधील एक विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उटलले. मध्यरात्री एक वाजता नमन अग्रवाल याने गच्चीवर जात खाली उडी मारली.

21 year-old student from Rajasthan jumps to death from IIT Bombay hostel | मध्यरात्री १ वाजता गच्चीवर गेला, सकाळी बॉडी सापडली; मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

मध्यरात्री १ वाजता गच्चीवर गेला, सकाळी बॉडी सापडली; मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

मुंबईतील आयआयटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.  नमन अग्रवाल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयआयटी बॉम्बे येथील हॉस्टेल नंबर चारच्या गच्चीवरून त्याने मध्यरात्री १ वाजता उडी मारली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार,  पवई येथील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या नमन अग्रवाल या विद्यार्थ्याने मध्यपात्री १ वाजता हॉस्टेलच्या गच्चीवरून उडी मारली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. नमन दुसऱ्या वर्षाचे B-Tech अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तो राजस्थानमधील पिलाणी येथील रहिवासी होता. तो आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक ४ मध्ये राहत होता.

या प्रकरणात नमन याच्या खोलीत कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. यामुळे आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. वई पोलिस या संबंधात तपास करत आहेत. या घटनेबाबत आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

मागील पाच वर्षात देशभरातील आयआयटीमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. 

Web Title : आईआईटी बॉम्बे: आधी रात गिरने से छात्र की मौत, आत्महत्या?

Web Summary : आईआईटी बॉम्बे में 21 वर्षीय छात्र नमन अग्रवाल की छात्रावास की छत से गिरने से दुखद मौत हो गई। कोई सुसाइड नोट नहीं मिला है, पुलिस जांच कर रही है। वह राजस्थान का बी.टेक छात्र था। यह घटना आईआईटी में छात्रों की आत्महत्या की बढ़ती प्रवृत्ति को दर्शाती है।

Web Title : IIT Bombay Student Suicide: Body Found After Midnight Fall

Web Summary : A 21-year-old IIT Bombay student, Naman Agarwal, tragically died after falling from his hostel rooftop around 1 AM. No suicide note was found, and police are investigating. He was a B.Tech student from Rajasthan. This incident highlights the concerning trend of student suicides in IITs.