Join us  

दिव्या भारतीच्या आईने कधीकाळी आमिर खानवर केले होते ‘हे’ आरोप? काय होतं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 8:00 AM

Divya Bharti, Aamir Khan : दिव्या भारती व आमिर खानचं हे प्रकरण त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं. नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) आज आपल्यात नाही. 1990 साली ‘बॉबिलि राजा’ या तेलगू चित्रपटातून दिव्या भारतीचा डेब्यू झाला आणि नंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. अनेक हिट तेलगू सिनेमे दिल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तिचा पहिला सिनेमा होता ‘विश्वात्मा’. हा सिनेमा 1992 साली रिलीज झाला होता. हिंदी सिनेमात काम करत असतानाच याच दिव्या भारतीसोबत असं काही घडलं की, जे सर्वांसाठीच धक्कादायक होतं. होय, दिव्या भारतीच्या आईने आमिर खानवर (Aamir Khan) अनेक आरोप केले. आता हे काय प्रकरण होतं? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर हे प्रकरण आहे ‘डर’ या चित्रपटाबद्दलच. 1993 साली रिलीज झालेल्या ‘डर’ या चित्रपटासाठी दिव्या भारती ही फर्स्ट चॉईस होती. तिच्यासोबत दिसणार होता आमिर खान. पुढे या दोघांच्या जागी शाहरूख खान व जुही चावलाची एन्ट्री झाली होती. कारण दिव्या व आमिर दोघंही सिनेमातून बाहेर पडले होते. ‘डर’च्या स्क्रिप्टवर काम सुरू झालं तेव्हा दिव्याला सनी देओलच्या अपोझिट किरणच्या रोलसाठी निवडलं गेलं होतं. पण दिव्याने हा सिनेमा सोडला. दिव्याच्या आईचा चित्रपटाच्या मेकर्ससोबत वाद झाल्यामुळे तिने हा सिनेमा सोडल्याचं म्हटलं गेलं होतं. पण नंतर दिव्याच्या आईने यावर खुलासा करताना आमिर खानने दिव्याच्या जागी जुही चावलाला रिप्लेस केल्याचा आरोप केला होता.

त्यावेळी दिव्या अमेरिकेत होती. ती अमेरिकेत जाण्यापूर्वीच ‘डर’ची घोषणा झाली. सनी देओल, आमिर खान व दिव्या भारती अशी स्टारकास्ट ठरली होती. पण दिव्या भारतात परतली तेव्हा जे घडलं ते पाहून हैराण झाली होती. कारण ‘डर’ची स्टारकास्ट बदलून तिच्या जागी जुहीची एन्ट्री झाली होती. यानंतर दिव्याच्या आईने आमिरवर आरोप केले होते. आमिरने चित्रपटासाठी जुहीच्या नावाची शिफारस केली. त्याच्यामुळे दिव्याला चित्रपटातून काढण्यात आलं, असा दिव्या च्या आईचा आरोप होता. मजेदार म्हणजे, पुढे आमिरही चित्रपटातून बाहेर पडला आणि त्याच्या जागी शाहरूखची एन्ट्री झाली.

दिव्याच्या आईचे आरोपसनी देओलला ‘डर’साठी साईन केलं तेव्हा त्याने दिव्याचं नाव सुचवलं होतं. पण आमिरने कथितरित्या जुहीचं नाव पुढे केलं, असा दावा दिव्याच्या आईने केला होता.  पुढे 1992 मध्ये दिव्या सुद्धा यावर बोलली होती. आमिरने माझ्यासोबत लंडनमध्ये कॉन्सर्ट करण्यास नकार दिला होता. मी लाईव्ह शोदरम्यान एक चूक केली होती. पण ती चूक अगदीच क्षुल्लक होती. मी ती तात्काळ दुरूस्तही केली होती. कुणालाही त्याबद्दल कळलं नव्हतं. पण आमिरने ती नोटिस केली आणि मग माझ्याऐवजी जुही चावलासोबत स्टेज शेअर केला, असं दिव्या म्हणाली होती. आमिरला दिव्यासोबत परफॉर्म करायचं होतं. पण मी थकलो आहे असे कारण सांगत आमिरने तिच्यासोबत स्टेज शेअर करायला नकार दिला होता. ऐनवेळी सलमान खानला दिव्यासोबत परफॉर्म करावं लागलं होतं.

टॅग्स :दिव्या भारतीआमिर खान