बाजीरावच्या भूमिकेचं सोनं करणाऱ्या रणवीर सिंगचा प्रवास वांद्रे येथील एका उद्योजकाच्या घरातला लहान मुलगा ते ताकदीचा अभिनेता, कसा झालाय हे उलगडलंय आमिर खाननं घेतलेल्या या मुलाखतीमधून...
आजचा दिवस शेवटचा, उद्याचा काय भरवसा हे तत्वज्ञान रोमारोमात नितांत भिनलेलं असल्यामुळे जे काही करायचं ते संपूर्ण झोकून देऊन आणि प्रत्येक क्षण जगायचं बेभान होऊन असंच मी जगत आलोय, रणवीर सांगतो...
आपण जे करतो त्यावर प्रेम करावं आणि ज्यावर प्रेम आहे तेच करावं असं ऐकायला सोप्पं पण आचरणात आणायला कठीण असं जगणं आहे रणवीरचं...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर कार्यक्रमात रणवीरची मुलाखत घेताना आमिर खान