‘साम दाम दंड भेद’मध्ये भानू उदय आणि ऐश्वर्या खरे यांनी साकारले असे दृष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 16:21 IST
भावना उद्दिपित करणारी धाडसी प्रणयदृष्ये आणि अशा दृष्यांदरम्यान संबंधित कलाकारांकडून पाळले जाणारे मौन हे केवळ हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित राहण्याचे ...
‘साम दाम दंड भेद’मध्ये भानू उदय आणि ऐश्वर्या खरे यांनी साकारले असे दृष्य
भावना उद्दिपित करणारी धाडसी प्रणयदृष्ये आणि अशा दृष्यांदरम्यान संबंधित कलाकारांकडून पाळले जाणारे मौन हे केवळ हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित राहण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.आता अशी दृष्ये अधिक चांगल्या प्रकारे आणि चित्रीत करता येऊ लागली आहेत.‘स्टार भारत’वरील ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत भानू उदय आणि ऐश्वर्या खरे यांनी असेच एक धाडसी प्रणयदृष्य सहज आणि विनासंकोच चित्रीत केले आहे.अशा प्रकारचे धाडसी प्रणयदृष्य टीव्हीवर चित्रीत करण्याची या दोन कलाकारांची ही पहिलीच वेळ होती.परंतु कथेची गरज आणि दिग्दर्शकाच्या मागणीनुसार त्यांनी हे दृष्य चित्रीत केले. हे दोघेही व्यावसायिक अभिनेते असून कथेच्या गरजेनुसार कोणतीही दृष्ये चित्रीत करण्यास ते नेहमीच तयार असतात. भानू सांगतो, “खरं सांगायचं झाल्यास टीव्ही मालिकेत मी प्रथमच अशी धाडसी रोमँटिक दृष्यं चित्रीत करीत आहे.ते दृष्य किती सहजपणे पार पडलं,यामुळे मी चकित झालो आहे.खरं म्हणजे रोमान्स करण्यातील माझं कौशल्य पाहून माझी पत्नी चकित झाली आहे कारण प्रत्यक्ष जीवनात मी काही तितकासा रोमँटिक पती नाही.”या दोन्ही कलाकारांचं पडद्यावरील नातं सामंजस्याचं असल्यामुळेच हे दृष्य वास्तववादी झाले असून त्यामुळे ते प्रत्येक प्रेक्षकाचे लक्ष नक्कीच वेधून घेईल.Also Read:‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत सोनल वेंगुर्लेकर ही मंदिराची, तर ऐश्वर्या खरे ही बुलबुलची व्यक्तिरेखा साकारत आहे.या दोघी एकमेकींच्या शत्रू असतात. पडद्यावर एकमेकींचा सहवास जराही सहन न करणार्या या अभिनेत्री कॅमेरा बंद होताच एकमेकींच्या गळ्यात पडतात. त्यांच्यातील वैर हे केवळ टीव्हीच्या पडद्यापुरते असून प्रत्यक्ष जीवनात त्या सच्च्या मैत्रिणीच नव्हे,तर बहिणीच असल्याचे मालिकेच्या सेटवरचे इतर कलाकार सांगतात.त्यामुळे दोघींना कधी कधी मालिकेत एकमेकींविरोधात भूमिका साकारताना विचित्र आणि विनोदीच वाटत असल्याचे ऐश्वर्या आणि सोनल सांगतात. आमचे विचारही खूप जुळतात.पडद्यावर भलेही आम्ही परस्परांच्या शत्रु दिसत असले तरी वास्तव जीवनात आम्ही सच्च्या मैत्रिणी असल्याचेही सोनल आणि ऐश्वर्याने सांगितले.