Join us  

'तुला पाहते रे' मालिका 'या' दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्या जागी ही मालिका येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 3:09 PM

'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. 

'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.  सुरूवातीला साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर व सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेनं रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. त्यानंतर या मालिकेत टर्न अँड ट्विस्ट आले. विक्रांत सरंजामेचे लग्न झालं असल्याचं ईशाला समजतं. त्यानंतर लग्न होतं आणि ईशा हिच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं समोर येतं. विक्रांतच राजनंदिनीला मारतो अशा बऱ्याच गोष्टी मालिकेत घडताना पाहायला मिळाल्या. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिका सुरू झाली तेव्हाच मालिका जास्त भागांची नसणार असल्याचं बोललं गेलं होतं. त्यामुळे मालिकेची कथा तशीच रेखाटण्यात आली होती. आता मालिकेची कथा निर्णायक वळणावर येत अखेर येत्या २० जुलै रोजी समाप्त होईल असं समजतं आहे. मालिकेचा शेवटचा भाग २० जुलै रोजी प्रसारीत होईल आणि याच दिवशी विक्रांत-ईशाच्या कथेचा शेवट पहायला मिळेल. 

मालिकेत सध्या इशा प्रेग्नंट आहे तर दुसरीकडे विक्रांतला त्याच्या चुकीची जाणीव झाली असून तो तिच्या खरोखर प्रेमात पडला आहे. त्यामुळे आता या कथेचा शेवट गोड होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात विक्रांत गायब झाला आहे आणि आता इशा त्याचा शोध घेताना दिसेल. यातून अजून काही ट्विस्ट निर्माण होतील आणि हळूवार कथा एका टप्प्यावर येऊन संपेल. त्यामुळे मालिका संपण्याचं दुःख प्रेक्षकांना असले तरी दुसरीकडे मालिकेच्या शेवटाची उत्सुकता सुद्धा लागली आहे. 

या मालिकेचे शूट पूर्ण झालं असून नुकतीच मालिकेच्या टीमची रॅप अप पार्टी पार पडली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसले.

त्यातही सुबोधने सर्व कलाकारांना व्यंगचित्र असलेल्या फ्रेम गिफ्ट म्हणून दिल्या.

तुला पाहते रे मालिका अखेर २० जुलै रोजी प्रेक्षकांचा निरोप घेईल आणि २२ जुलै पासून या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची अग्गंबाई सासूबाई मालिका भेटीला येणार आहे. 

 

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठी