Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये दोन चिमुरड्यांची एन्ट्री; जाणून घ्या कोणाची आहेत ही मुलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:11 PM

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेत एन्ट्री झालेल्या दोन चिमुरड्यांचा माईंसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata). या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. नुकतेच मालिकेत गौरी आणि जयदीप हनीमूनसाठी गेले आहेत. दरम्यान मालिकेत आता दोन चिमुरड्यांची एन्ट्री झाली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मालिकेत गौरी आणि जयदीप आता बाळाचा विचार करत आहेत. त्यामुळे दादा आणि माई खूप खूश आहेत. त्यामुळे मालिकेत लवकरच गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात चिमुकल्याचे आगमन होणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दरम्यान गौरी आणि जयदीप यांच्या चिमुकल्याची एन्ट्री होण्यापूर्वी मालिकेत आता दोन चिमुरड्यांचे आगमन होणार आहे. या चिमुरडींचे माईसोबतचे काही फोटोदेखील व्हायरल झाले आहेत.

हे दोन चिमुरडे आहेत तुमच्या परिचयाचेमालिकेत एन्ट्री केलेले चिमुरडे तुमच्या चांगल्याच परिचयाचे आहेत. बऱ्याचदा मालिकेत तुम्ही त्यांचे नाव ऐकलेले आहे. ते म्हणजे क्रिश आणि कशिश. हे दोघे देवकी आणि उदयची मुले आहेत. इतके वर्षे देवकीच्या माहेरी मुले राहत होती. ते आता शिर्के पार्टील यांच्या बंगल्यात राहण्यासाठी आली आहेत. क्रिशच्या भूमिकेत बालकलाकार अमृत गायकवाड पाहायला मिळतो आहे. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत काम केले आहे.  मेरे साई मालिकेत साईंच्या बालपणीची भूमिका केली होती. विठू माऊली मालिकेत नामदेवची भूमिका साकारली होती. याशिवाय तो समांतर या वेबसीरिज, गाथा नवनाथांची या मालिकेत झळकला आहे. त्यांच्या या एन्ट्रीमागं काय कारण आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

टॅग्स :स्टार प्रवाह