Join us  

2 वर्षांनंतर टप्पूचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'या' मालिकेतून करणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 7:15 PM

'शादी के स्यापे' शोमध्ये तो दिसणार आहे. भाव्याने नुकताच या शोचा प्रमोशन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या शोमध्ये नव-नवीन कथा-कहाण्या सादर केल्या जाणार आहेत.

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रांवर रसिकांनी भरभरून पसंती दर्शवली. टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भाव्या गांधी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला होता. भाव्या गांधीला याच मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेतील त्याचा अभिनय, त्याची केस उडवण्याची स्टाइल सगळे काही रसिकांना खूपच आवडायची. ही मालिका सुरू झाल्यापासूनच तो या मालिकेचा भाग होता. 

गेली आठ वर्ष तो या मालिकेत काम करत होता. मात्र जेव्हा टप्पूने मालिका सोडल्याचा निर्णय घेतला तेव्हा बच्चेकंपनीसह सा-यांनीच नाराजी दर्शवली होती. भाव्या गांधीने पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री करावी अशीच त्याच्या चाहत्यांचीही इच्छा होती. अखेर सा-यांची इच्छा आता भाव्या गांधी पुर्ण करणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सोडल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी तो पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'शादी के स्यापे' शोमध्ये तो दिसणार आहे. भाव्याने नुकताच या शोचा प्रमोशन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या शोमध्ये नव-नवीन कथा-कहाण्या सादर केल्या जाणार आहेत. तसेच हा शो 16 मार्चपासून सुरू होत आहे. मालिकेत त्याच्या लूकवरही मेहनत घेण्यात आली आहे. अतिशय स्टायलिश लूकमध्ये भाव्या दिसत आहे. त्याचा हा बदललेला लूक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे.

 

एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये  भाव्याने सांगितले होते की, " टप्पू ही भूमिका खूप चांगली होती, पण वेळेनुसार बदल करण्याता येत नव्हते. साचेबद्ध भूमिकेत अडकले तर पुढे काहीच करता येणार नाही. शिवाय  मेकर्ससोबत माझ्या कॅरेक्टरला दुय्यम वागणूक दिली जात होती. त्या भूमिकेला स्कोप देण्यात आला नाही. त्यामुळेच शो सोडण्याचा निर्णय घेतला होता."

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासोनी सब