Join us  

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण; आशुतोषने वाचवला अरूंधतीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:27 PM

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत नुकतेच धक्कादायक वळण आले आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कांचन, आप्पा, अरुंधती, अनिरूद्ध, यश, ईशा, अभिषेक, अनघा, रुपाली आणि गौरीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील पात्र बऱ्याचदा चर्चेत येत असतात. नुकतेच या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. 

मालिकेतील नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, सुधीर घरी येतो आणि सगळ्यांना सांगतो की अरूंधती आणि आईच्या बसचा अपघात झाला आहे. त्यानंतर अनिरुद्ध लगेच संजनाला फोन करतो आणि सांगतो की अरुंधती आणि तिच्या आईच्या बसचा अपघात झाला आहे. त्यावेळी संजना आशुतोष केळकरसोबत मीटिंगमध्ये असते. त्यामुळे ही बातमी ती आशुतोषला सांगते. घरातील सगळे टेन्शनमध्ये असतात. अरुंधती आणि तिची आई सुखरुप असतील ना, अशी काळजी त्यांना वाटत असते. यश, अभिषेक अरुंधतीला शोधण्यासाठी जातात. तसेच आशुतोषदेखील अरुंधतीला शोधण्यासाठी जातो.  आशुतोषला अरुंधती सापडते. तिला थोडेफार लागलेले असते. तिची आई सुखरुप असते. त्यानंतर यश, अभिषेक आणि आशुतोष अरुंधतीला घरी घेऊन येतात. अरुंधती सुखरूप आहे हे कळल्यावर आप्पा, कांचन आणि घरातील सर्वांना आनंद होतो. तेव्हा आप्पा अरुंधतीला म्हणतात की, तू नव्हतीस तेव्हा आमच्या जीवात जीव नव्हता. विमल अरुंधतीची दृष्ट काढते. 

अरुंधती सुखरुप असल्याचे समजल्यावर देशमुख कुटुंब होतं आनंदीदरम्यान अनिरूद्ध देखील अरुंधती सुखरूप असल्याचे समजल्यावर खूष होतो. जेव्हा अरुंधतीचा अपघात झाल्याचे समजते तेव्हा अनिरुद्ध देखील कावराबावरा होतो. अरुंधतीला किरकोळ जखम झालेली असते. यश लगेचच दवाखान्यातून घेवून येतो. घरातील सगळे अरुंधतीची काळजी घेत असतात. त्यावेळी अनिरुद्धदेखील तिची मदत करताना दिसतो. मात्र संजनाला खटकते. त्यामुळे आता संजना नवीन भांडणं उकरून काढेल का, हे आगामी भागातच कळेल. तसेच आशुतोष पुन्हा एकदा अरुंधतीचा जीव वाचवतो, त्यामुळे त्यावरून अनिरुद्ध काही नवीन वाद निर्माण करतो का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका