Join us

​या कारणामुळे थांबले ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 13:26 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या कथानकाला आता खूपच चांगले वळण मिळालेले आहे. या मालिकेत प्रेक्षकांना कार्तिक आणि ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या कथानकाला आता खूपच चांगले वळण मिळालेले आहे. या मालिकेत प्रेक्षकांना कार्तिक आणि नायराचे लग्न पाहायला मिळणार आहे. मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे प्रेक्षक चांगलेच खूश होतील. पण या भागाचे चित्रीकरण करत असताना मालिकेच्या सेटवरदेखील चांगलाच ट्विस्ट आला होता. सेटवर एक समस्या निर्माण झाल्याने अर्धा ते पाऊण तास चित्रीकरण थांबवावे लागले. मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर साखरपुड्यासाठी आवश्यक असलेली अंगठीच नसल्याचे लक्षात आले आणि सेटवर एकच गोंधळ उडाला. चित्रीकरण करायला सुरुवात करणार तेवढ्यात या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान आणि नैराची भूमिका साकारणाऱ्या शिवांगी जोशीच्या लक्षात आले की, त्यांना साखरपुड्याच्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी देण्यात आलेले अंगठीचे दोन्ही बॉक्स हे रिकामे आहेत. हे कळल्यानंतर लगेचच संपूर्ण टीम अंगठी शोधायला लागली. कारण त्या अंगठीशिवाय चित्रीकरण करणे अशक्य होते. त्यामुळे कलाकारांपासून, तंत्रज्ञांपासून सगळ्यांनाच अंगठी शोधण्याचे काम लागले. जवळजवळ अर्ध्या-पाऊण तासानंतर अंगठी मिळाली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. मालिकेत प्रेक्षकांना आता कार्तिक आणि नायराचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. साखरपुड्या दरम्यान ते दोघे खूप मजामस्तीदेखील करणार आहेत. तसेच काही खेळ खेळतानादेखील दिसणार आहेत. तसेच कार्तिक आणि नायरापैकी एकाची अंगठी ही हिऱ्याची नसून खोटी असल्याचे त्या दोघांच्या लक्षात येणार आहे. पण आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी ते सगळ्यांपासून ही गोष्ट लपवणार आहेत.