Join us  

भारती सिंगने शेअर केले हनीमुनचे फोटो,या ठिकाणी करतायेत Enjoy

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 12:09 PM

टीव्ही इंडस्ट्रीची न्युली वेड कपल भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सध्या त्यांचे हनीमुन एन्जॉय करत आहेत.लग्न झाल्यानंतर महिनाभरासाठी हे ...

टीव्ही इंडस्ट्रीची न्युली वेड कपल भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सध्या त्यांचे हनीमुन एन्जॉय करत आहेत.लग्न झाल्यानंतर महिनाभरासाठी हे दोघेही युरोप टुरवर हनीमुनसाठी जाणार असल्याचे सांगितले होते.ग्रीस, स्पेन, बारसालोना, इटली या ठिकाणी हे आपले हनीमुन एन्जॉय करणार आहेत.भारतीने तिच्या हनीमुनची सुरूवात गोव्यापासूनच केली आहे.भारती आणि हर्ष गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर फिरतानाचे फोटो समोर आले आहेत.बीचवर फिरण्यासाठी निघालेली भारती ब्लॅक कलर शॉट्स आणि व्हाइट टी-शर्टमध्ये होती.तर हर्ष देखील शॉट्स आणि टी-शर्टमध्ये होता.या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत रोमँटीक टाईम स्पेंड करताना दिसतायेत.दोघांचा कुल अंदाज पाहताच चाहतेही तिच्या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतायेत.  भारती आणि हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.त्या दोघांची ओळख एका रिअॅलिटी शोच्या दरम्यानच झाली होती.हर्ष हा लेखक असून तो देखील चांगलाच प्रसिद्ध आहे.गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडला.टीव्ही सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात मच अवेटेड वेडिंग म्हणून भारती आणि हर्षच्या शुभमंगल सोहळ्याकडे पाहिले जात होते.त्यामुळे त्यांच्या लग्नाआधी बरीच चर्चा झाली.त्यांच्या कपड्यांपासून,संगीत सोहळा ते थेट लग्नापर्यंत त्यांच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती.त्यामुळेच आता त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या हनीमुनचीही चर्चा होणारच.सध्या गोव्यातली धम्माल मस्ती हर्षने कॅमे-यात कैद करुन सोशल मीडियावर शेअर केली आहे.तसे 2017 हे वर्ष दोघांसाठी खास ठरले आहे.या वर्षाचा इअर एंड स्पेशल बनवण्यासाठी खास युरोप टुर करताना काही खास फोटोही भारती आणि हर्ष शेअर करतीलच.शिवाय नवीन वर्षाचे सेलिब्रेशनही दोघे परदेशातच करणार आहेत. cnxoldfiles/a>मग असे काय घडले की,कपिल शर्मा भारतीच्या लग्नात गेलाच नाही.कपिलचे लग्नात उपस्थिती नसणे या गोष्टीचे सा-यांनाचा आश्चर्य वाटत आहे.त्यामुळे सध्या या गोष्टीवरही खूप चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला कपिल भारतीच्या लग्नात का नव्हता याचे कारण सांगणार आहोत.कपिल ने भारतीच्या लग्नात न जाण्याचे कारण आहे कपिलचा 'यार' तो म्हणजे सुनील ग्रोव्हर.होय,कारण भारतीच्या लग्नात सुनील ग्रोव्हरही जाणार होता.सुनील ग्रोव्हर लग्नात येणार हे कळताच कपिलने लग्नात न जाण्याचा निर्णय घेतला.आणि सुनीलनेही कपिल या सोहळ्यात येणार असल्याचे कळताच गोव्यात पोहचुन सुध्दा रिटर्न त्याच दिवशी मुंबईला रवाना झाला.